नवगण महाविद्यालयात सामाजिकशास्त्र अभ्यास मंडळाची स्थापना
यावेळी बोलताना प्रा. आंधळे म्हणाले की सामाजिकशास्त्र मुळे जीवनविषयक कौशल्यांची समीक्षा आणि परीक्षा होते. साहित्यातील अभिव्यक्ती प्रमाणेच सामाजिक विचार आणि चिंतन व्यक्त करण्यासाठी सामाजिकशास्त्र मंडळाची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ एम जी राजपांगे हे होते.
अभ्यास मंडळाच्या सचिवपदी माने गोविंद दिलीपराव यांची तर अध्यक्षपदी श्वेता जगदीशप्रसाद दुबे यांची निवड करण्यात आली आहे .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. बबन झांजे यांनी केले तर आभार डॉ राजा आचार्य यांनी व्यक्त केले.कार्यक्रमास सर्व सामाजिक शास्त्राचे प्राध्यापक, विभागप्रमुख उपस्थित होते
Comments
Post a Comment